{khapre.org}
Nothing More : Nothing Less : Just Perfect : Online Since 1997
Friday, October 10, 2008

मुंबई आमचीच

काही दिवसांपूर्वी मुंबईचे कमिशनर म्हणाले, मुंबई काय कोणाच्या बापाची नाही. असं बोलायचं काही काम होतं का? पण नाही एवढ्या मोठ्या जागेवरून अशी खळबळजनक विधाने करायची नसतात, हे त्यांना कोणी सांगावं. म्हणजे महाराष्ट्रात, मुंबईत बसून असं विधान म्हणजे आहे की नाही गंमत. पेटले रान. बोलणारे बाजूला झाले, बाकीच्यांच्यात जुंपली. दसर्‍याला उद्धव ठाकरेंचे, अफाट जनसमुदायासमोर भाषण झाले, ते म्हणाले होय मुंबई आमच्या बापाचीच आहे. आज नारायण राणे काय म्हणतात ते पाहू या

http://www.esakal.com/esakal/10112008/Maharashtra94D466BB90.htm

मुंबई "यांच्या' बापाची कशी? - नारायण राणे
मुंबई, ता. १० - "उद्धव ठाकरे म्हणतात, मुंबई आमच्या बापाची आहे. म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून विचारले, तर कळले सातबाराच्या उताऱ्यावर त्यांची कुठे नोंद नाही, मग मुंबई यांच्या बापाची कशी?'
अशा शब्दांत महसूल मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील वक्तव्याची खिल्ली उडविली आहे. शिवसेना आता बाळासाहेब चालवित नाहीत; तर दुसरेच कोणी तरी चालविते, अशी टीकाही राणे यांनी केली आहे.

किती बालीशपणा. मुंबईचे नाव सातबारा उतार्‍यावर असायला ती काय खाजगी मालमत्ता आहे काय? जेव्हा ’ भारत माझा देश आहे’ असे आपण म्हणतो, तेव्हा भारताचा सातबारा उतारा शोधायची गरज नाही. ठाकरे म्हणाले, याचा गर्भितार्थ असा की, महाराष्ट्रात जन्म घेतलेल्यांची मुंबई आहे.

जर आपल्या घरात चोर घुसला तर त्याला पेकाटात लाथ मारून हाकलून देतात, त्याला सातबारा उतारा दाखवत नाहीत. शनिवार वाडा, ताजमहाल, कुतुबमिनार, सर्व गड किल्ले, संसद अशा सर्वाचे सातबारा उतारे तयार करावे लागतील.

होय मुंबई आमच्या बापाचीच आहे, संयुक्त मुंबईचा लढा देतानाचा इतिहास मागे जाऊन पहावा.

  • संयुक्त महाराष्ट्राबद्दल CIIL येथील लेख
  • महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळातील संयुक्त महाराष्ट्र लढ्याविषयीची माहिती
  • ही संकेतस्थळे पहा, आणि ही पहा नावे हुताम्यांची

    हुतात्म्यांची नावे

    २१ नोव्हेंबर १९५५ चे हुतात्मे[१] १) सीताराम बनाजी पवार २)जोसेफ डेव्हिड पेजारकर ३)चिमनलाल डी.सेठ ४) भास्कर नारायण ५)रामचंद्र सेवाराम ६)शंकर खोटे ७)मीनाक्ष मोरेश्वर ८)धर्माजी नागवेकर ९)चंद्रकांत लक्ष्मण १०)के.जे.झेवियर ११)पी.एस.जॊन १२शरद जी. वाणी १३)वेदीसिंग १४)रामचंद्र भाटिया १५)गंगाराम गुणाजी

    मुंबईच्या वरिष्ठ न्यायालयासमोर फ्लोरा फाउंटनवर मुंबई सरकारने मिरवणुकीवर केलेल्या गोळीबारात वरील १५ जणांनी हौतात्मे पत्करले.

    जानेवारी १९५६ चे हुतात्मे १६) बंडू गोखले १७)निवृत्ती विठोबा मोरे १८)आत्माराम रावजी पालवणकरण १९)बालप्पा सुनप्पा कामाठी २०)धोंडू लक्ष्मण पारडूले २१)भाऊ सखाराम कदम २२) यशवंत बाबाजी भगत २३) गोविंद बाबूराव जोगल २४) भाऊ सखाराम कदम २५) पांडुरंग धोंडु धाडवे २६)गोपाळ चिमाजी कोरडे २७) पांडुरंग बाबाजी जाधव २८) बाबू हरु काते २९) अनुप महावीर ३०) विनायक पांचाळ ३१) सीताराम गणपत म्हात्रे ३२)सुभाष भिवा बोरकर ३३)गणपत रामा तानकर ३४)सीताराम गयादीन ३५) गोरखनाथ रावजी जगताप ३६) महंमद अली ३७) तुळशीराम पुंजाजी बेलसरे ३८) देवाजी सखाराम पाटील ३९) शामलाल जेठानंद ४०) सदाशिव महादेव भोसले ४१) भिकाजी पांडुरंग रंगाटे ४२) बासुदेव सूर्याजी मांजरेकर ४३) भिकाजी बाबू बाबरकर ४४)सखाराम श्रीपत ढमाले ४५) नरेंद्र प्रधान ४६) शंकर गोपाळ कुष्टे ४७)दत्ताराम कृष्णा सावंत ४८)बबन बापू बरगुडे ४९) विष्णु सखाराम बने ५०)सीताराम धोंडु राडे ५१) तुकाराम धोंडु शिंदे ५२)विठ्ठल गंगाराम मोरे ५३)रामा लखन विंदा ५४)एडवीन आमरोझ साळ्वी ५५)बाब महादू सावंत ५६)वसंत द्वारकानाथ कन्याळकर ५७)विट्ठल दौलत साळुंके ५८)रामनाथ पांडुरंग अमृते ५९)परशुराम अंबाजी देसाई ६०)घनशाम बाबू कोलार ६१)धोंडू रामकृष्ण सुतार ६२)मुनीमजी बलदेव पांडे ६३)मारुती विठोबा मस्के ६४)भाऊ कोंडीबा भास्कर ६५)धोंडो राघो पुजारी ६६)-दयसिंग दारजेसिंग ६७) पांडू महादू अवरीरकर ६८) शंकर विठोबा राणे ६९)विजयकुमार सदाशिव बेडेकर ७०)कृष्णाजी गणू शिंदे ७१)रामचंद्र विठ्ठल चौगुले ७२)धोडु भागु जाधव ७३)रघुनाथ सखाराम बेनगुडे ७४)काशीनाथ गोविंद चिंदरकर ७५) करपैया किरमल देवेंद्र ७६)चुलाराम मुंबराज ७७)बालमोहन ७८) अनंता ७९)गंगाराम विष्णु गुरव ८०)रत्नु गोंदिवरे ८१) सय्यद कासम ८२)भिकाजी दाजी ८३)अनंत गोळतकर ८४)किसन वीरकर ८५)सुखलाल रामलाल बंसकर ८६)पांडुरंग विष्णु वाळके ८७)फुलवरु मगरु ८८)गुलाब कृष्णा खवळे ८९)बाबूराव देवदास पाटील ९०) लक्ष्मण नरहरी थोरात ९१)ठमाबाई विठ्ठल सूर्यभान ९२) गणपत रामा भुते ९३)मुनशी वझीर अली ९४)दौलतराम मथुरादास ९५) विठ्ठ्ल नारायण चव्हाण ९६) सीताराम घाडीगावकर ९७) अनोळखी ९८)अनोळखी बेळगाव ९९) मारुती बेन्नाळकर १००)मधुकर बापू वांदेकर १०१)लक्ष्मण गोविंद गावडे १०२) महादेव बारीगडी १०३)सौ. कमळाबाई मोरे ( निपाणी) १०४) व १०५) नावे मिळत नाही

    एवढ्या आमच्या महाराष्ट्रीयांनी हौताम्य पत्करल्यावर आम्ही ठासून म्हणणारच "होय मुंबई आमच्या बापाचीच आहे" 

    भारत माझ्या बापाचा आहे, कारण स्वातंत्र्यलढ्याला नंदुरबारच्या शिरीषकुमार पासून जालीयनवालाबाग पर्यंतचा इतिहास आहे. हे आमचे दुर्दैव की आम्ही त्यावेळेस जन्मलेलो  नव्हतो, नाहीतर कोणी सांगावं आम्हीही शहीद झालो असतो.

    आपापसातले तार्किक वाद बाजूला ठेऊन सर्व राजकारण्यांनी आपल्या जन्मभूमी, मातृभूमीसा साठी हातात हात घालून सामना द्यायला पाहिजे.

    Labels:


    दिलीप खापरे@9:53 PM < 4 (0) @ Add

    . . ° º o O o º ° . .