{khapre.org}
Nothing More : Nothing Less : Just Perfect : Online Since 1997
36
Saturday, October 18, 2008

पोलीस मित्र

आताच्या या बेभरंवशाच्या जगात चोर, दरोडेखोरांपासून आपल्याला कोण वाचवू शकेल, परमेश्वर नाही तर, फक्त पोलीसच. पण का कोणास ठाऊक पोलीस मात्र सामान्य माणसाला मित्र वाटत नाही. आता याला पोलीस जबाबदार असू शकत नाही, नाही का?

जगात अनेक प्रकारची लोकं आहेत, त्यांच्याकडे पाहून तरी हे समजत नाहीना की, हा सज्जन की चोर? जगात चोर्‍या होतात, ज्यांचा माल चोरीस जातो त्यालाच दुःख होते ना? मग त्याला माल मिळवून देण्यासाठी कोण मदत करणार? अशा वेळेस जर पोलीसांशिवाय कोणाकडे मदत मागितली तर मिळू शकेल काय? पण पोलीस रात्रंदिवस मागे लागून चोराला शोधण्याचा प्रयत्न करतो, अशा वेळेस कोणी सापडले तर तो कबूल करेल काय? मग पोलीसांना धाक दाखवावाच लागतो. कोणीही सहजासहजी कबूल करणार नाही? खूनाच्या केस मध्ये जर पोलीस म्हणू लागले, अरे सर्वजण खरेच बोलतात, तर कोणी आपण होऊन कबूल करणार नाही. कोणीही गुन्हेगार प्रेमाणे कबूल होत नाही. जर अशी वागणूक पोलीस देऊ लागले तर, ज्याच्यावर अन्याय झालाय त्याचे काय?

गणेशोत्सव, नवरात्र, मोहरम, जैनांची मिरवणूक, शोभायात्रा, अशा कितीतरी बाबतीत पोलीसांना संरक्षणासाठी बदोबस्ताला जावे लागते, तेव्हा वेळेचे बंधन रहात नाही. पुण्यात गणपती विसर्जनाच्या वेळी तर पोलीस चाळीस चाळीस तास ड्युटी बजावतात. सगळेजण आपापल्य नादात असतात, पण त्यांच्ताकडे कोणाचेच लक्ष नसते. सणवर तर त्यांना माहितच नसतो. अरे, ते जर सणवार करू लागले  तर आपले संरक्षण कोण करणार.रोजच शिमगा होणार. आज पोलीस खाते आहे, म्हणून आपण रात्री शांत झोपू शकतो.

कल्पना करा, पोलीस खाते बंदच करून टाकले तर? कोणीही सबल दुर्बलांना त्रास देईल. स्त्रीया मुलींची अब्रू राहील काय? दिवसा ढवळ्या लोकांवर अत्याचार होतील. आता पोलीस आहेत तरी राजरोस खून होताहेत, दंगली भडकताहेत, लूटालूट होत आहे. मग दाद मागायला जागा नसेल तर? एखादा माणूस तक्रार द्यायला चौकीत जातो, तेव्हा त्याला माहित आहे की त्याची बाजू खरी आहे, पण हे त्यावेळेच्या पोलीसाला कसे समजणार? त्याला चौकशी करावीच लागणार? तक्रारदाराच्या सांगण्यावरून कारवाई होत नाही. जर तक्रार करणाराच खून करून कोणा दुसर्‍याचे नाव घेत नसेल कशावरून? मग त्या माणसावर अन्याय नाही का?

वाहतूक पोलीस नसेल तरची कल्पना करा. चौकात काय हाल होतील, कोणीही वेळेवर घरी पोहोचू शकणार  नाही. लोकांना राग असतो, उगीचच थांबवून परवाना विचारतात, पण विना परवाना वाहन चालक असतातच ना? अपघात करून पळून गेलेल्याला पोलीस शोधून आणतात, तेव्हाच अपघातग्रस्ताला न्याय मिळतो ना?

जो पिडीत आहे त्याला विचारा पोलीसाचे महत्व. ज्याच्यासाठी पोलीस साक्ष द्यायला कोर्टात उभारतात, त्याला विचारा, बलात्कारीत स्त्रीला विचारा, अशिक्षीतांना विचारा पोलीस किती मित्र आहे ते.

Labels:


दिलीप खापरे@4:00 AM < 4 (0) @ Add

. . ° º o O o º ° . .