{khapre.org}
Nothing More : Nothing Less : Just Perfect : Online Since 1997
36
Wednesday, September 23, 2009

घराणेशाहीचं चांगभलं

भरतात राजकारण म्हणजे चराऊ कुरण झाले आहे, कोणीही कसेही खा कोणी बोलणार नाही. असा विचार करून राजकारणी मंडळींनी आपल्या वाली वारसांना या धंद्यात ओढायचे ठरवलेले दिसते. बरोबर आहे, यात काही अक्कल लागत नाही, डिग्री लागत नाही.

भाजपाचे सर्वेसर्वा श्री.गोपीनाथ मुंडे यांची घराणेशाही- बंधू पंडितअण्णा मुंडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष. त्यांचे चिरंजीव धनंजय मुंडे परळी मतदारसंघासाठी, गोपीनाथरावांची कन्या सौ. पंकजा पालवे मुंडे उमेदवारी जाहीर. पंडितअण्णांचे जावई मधुसूदन केंद्रे गंगाखेड मधून उमेदवारी, धनंजय मुंडे यांना आष्टीतून उमेदवारी.

महाजन घराणेशाही - प्रमोद महाजन यांच्या कन्या सौ.पूनम महाजन राव घाटकोपर पश्चिम मतदार संघ.

विलासराव देशमुख - त्यांचे बंधू दिलीपराव देशमुख राज्य विधान परिषदेचे सदस्य, अमित देशमुख लातूर ग्रामीण मतदारसंघातू्न.

सुशीलकुमार शिंदे खासदार - वारसदार कन्या प्रणिती शिंदे सोलापूर मध्य मधून उमेदवारी.

छगन भुजबळ - पुतणे समीर भुजबळ ना्शिकचे खासदार, स्वतः छगन भुजब्ळ येवल्यातून उमेदवार,माझगाव मधून पंकज भुजबळ.

गणेश नाईक - स्वतः पर्यावरण मंत्री, चिरंजीव संजीव नाईक ठाण्याचे खासदार, दुसरे चिरंजीव संदीप नाईक ऐरोली मधून उत्सुक.

रण्जीत देशमुख - कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, त्यांचे चिरंजीव आशिष देशमुख भाजपच्या तिकीटावर, तर अनिल देखमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख नागपूर पश्चिम मतदारसंघातून इच्छुक.

प्रमोद शेंडे - विधानसभेचे उपाध्यक्ष, यांचे चिरंजीव शेखर शेंडे वर्धा मतदारसंघातून उमेदवारी.

रिपब्लिन नेते जोगेंद्र कवाडे यांचे चिरंजीव जगदीप कवाडे, शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव अभिजीत, वर्धा जिल्ह्यातील सुरेश देशमुख यांचे चिरंजीव समीर देशमुख, लातूरचे खासदार जयंत आवळे यांचे चिरंजीव राहुल आवळे, तर भाजपचे खासदार संतोष दानवे यांनी आपल्या पत्नी निर्मला यांच्यासाठी उमेदवारी निश्चित करून घेतली. 


दिलीप खापरे@6:03 AM < 4 (0) @ Add

. . ° º o O o º ° . .


36
Tuesday, September 22, 2009

यशाचा मार्ग

मार्ग यशाचा जीवनात महत्वाचा

त्याबद्दल दोन गोष्टी सांगतो, पहा-
दोन सुतार असतात. दोघं दोन खोल्यांमध्ये काम करत असतात. चंदू आणि नंदू अशी या दोघांची नावे. चंदू जो सकाळी आठ वाजता कामला सुरुवात करायचा, तो दुपारी दोन वाजताच थांबायचा. दोन ते तीन जेवणाची वेळ आणि मग तीन नंतर परत जे काम सुरु तर सहा वाजेपर्यंत कामच काम. नंदूचे मात्र जरासे वेगळे होते. तो दर तासाने पाच मिनिटे थांबत असे आणि सारखे थांबूनदेखील त्याचे काम अधिक तर असेच; पण ते अधिक सफाईदारदेखील असे.
चंदूला या गोष्टीचे खूप आश्चर्य वाटे. एकदा तो नंदूला म्हणाला, '' नंदू, मी तर अगदी १ मिनिटदेखील न थांबता, वेळ न दवडता काम करतो तरी तुझ्यापेक्षा माझे काम कमीच असते. तू तर दर तासाने जरा वेळ थांबतो तर असे कसे काय घडते ? '' यावर नंदूने त्याला सांगितले, '' अरे चंदू, मी दर तासाने जरा वेळ थांबतो, याचा अर्थ मी अजिबात वेळ वाया घालवत नाही. उलट दर तासानं मी माझ्या हत्यारांना धार करतो. म्हणजे हत्यारे धारदार होऊन तेज चालतात आणि काम लवकर व सफाईदार होते. ''
तर हे असेच आहे. आपले काम जास्त होणे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच ते दर्जेदार, परिपूर्ण आणि गुणात्मकदृष्ट्या उच्च मूल्यांचेच झाले पाहिजे असा ध्यास घेतला, तर नक्कीस उत्कृष्ट प्रतीचे परिपूर्ण काम करण्यात आपल्याला यश मिळु शकते. त्यासाठी आपण सर्वप्रथम ' मला हे जमणार नाही, अशक्य आहे, नकोच ' इ. शब्द आपल्या शब्दकोशातून कायमचे हद्दपार करायला हवे.
नेपोलियनच्या शब्दकोशात अशक्य हा शब्दच नव्हता, असे आपण कायमच ऐकतो. सुनील राममूर्ति हे तरुण वक्त तरुणांना कायम सांगतात. ' इम्पॉसिबल ' ( अशक्य ) या इंग्रजी शब्दाची फोड करा. I m possible - आय एम पॉसिबल दडलेला आहे आणि त्यातला ' आय ' फार म्हणजे फार महत्वाचा आहे. ' आय ' म्हणजे -  ' मी.'  मला शक्य आहे. ' फक्त मलाच शक्य आहे, ' असाच अर्थ या शब्दातून व्यक्त होतो आणि हे कळण्यासाठी, आपल्या अंतरीच्या शक्ती जागृत होण्याची गरज असते आणि त्या जागृत करणे हेदेखील फक्त आपल्याच हातात असते. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची वृत्ती जागी झाली पाहिजे.

सकारात्मक विचार नेहमी वंशपरंपरागत असतो-

प्रत्येक यशस्वी माणूस हा सकारात्मक विचारांचा असतो. आपल्या चुकांमधून खचून न जाता, आपल्याकडून काय चूक झाली ? का झाली ? माझे प्रयत्न कुठे आणि कसे कमी पडले ? कोणती पद्धत जास्त फायद्याची ठरली असती ? असे जर आपल्या चुकांचे आपणच परीक्षण केले आणि स्वतःला सुधारले, तरच आपण यशाकडे वाटचाल करु शकतो.

मार्ग यशाचा जीवनात महत्वाचा

त्याबद्दल दोन गोष्टी सांगतो, पहा-
दोन सुतार असतात. दोघं दोन खोल्यांमध्ये काम करत असतात. चंदू आणि नंदू अशी या दोघांची नावे. चंदू जो सकाळी आठ वाजता कामला सुरुवात करायचा, तो दुपारी दोन वाजताच थांबायचा. दोन ते तीन जेवणाची वेळ आणि मग तीन नंतर परत जे काम सुरु तर सहा वाजेपर्यंत कामच काम. नंदूचे मात्र जरासे वेगळे होते. तो दर तासाने पाच मिनिटे थांबत असे आणि सारखे थांबूनदेखील त्याचे काम अधिक तर असेच; पण ते अधिक सफाईदारदेखील असे.
चंदूला या गोष्टीचे खूप आश्चर्य वाटे. एकदा तो नंदूला म्हणाला, '' नंदू, मी तर अगदी १ मिनिटदेखील न थांबता, वेळ न दवडता काम करतो तरी तुझ्यापेक्षा माझे काम कमीच असते. तू तर दर तासाने जरा वेळ थांबतो तर असे कसे काय घडते ? '' यावर नंदूने त्याला सांगितले, '' अरे चंदू, मी दर तासाने जरा वेळ थांबतो, याचा अर्थ मी अजिबात वेळ वाया घालवत नाही. उलट दर तासानं मी माझ्या हत्यारांना धार करतो. म्हणजे हत्यारे धारदार होऊन तेज चालतात आणि काम लवकर व सफाईदार होते. ''
तर हे असेच आहे. आपले काम जास्त होणे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच ते दर्जेदार, परिपूर्ण आणि गुणात्मकदृष्ट्या उच्च मूल्यांचेच झाले पाहिजे असा ध्यास घेतला, तर नक्कीस उत्कृष्ट प्रतीचे परिपूर्ण काम करण्यात आपल्याला यश मिळु शकते. त्यासाठी आपण सर्वप्रथम ' मला हे जमणार नाही, अशक्य आहे, नकोच ' इ. शब्द आपल्या शब्दकोशातून कायमचे हद्दपार करायला हवे.
नेपोलियनच्या शब्दकोशात अशक्य हा शब्दच नव्हता, असे आपण कायमच ऐकतो. सुनील राममूर्ति हे तरुण वक्त तरुणांना कायम सांगतात. ' इम्पॉसिबल ' ( अशक्य ) या इंग्रजी शब्दाची फोड करा. I m possible - आय एम पॉसिबल दडलेला आहे आणि त्यातला ' आय ' फार म्हणजे फार महत्वाचा आहे. ' आय ' म्हणजे -  ' मी.'  मला शक्य आहे. ' फक्त मलाच शक्य आहे, ' असाच अर्थ या शब्दातून व्यक्त होतो आणि हे कळण्यासाठी, आपल्या अंतरीच्या शक्ती जागृत होण्याची गरज असते आणि त्या जागृत करणे हेदेखील फक्त आपल्याच हातात असते. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची वृत्ती जागी झाली पाहिजे.

सकारात्मक विचार नेहमी वंशपरंपरागत असतो-

प्रत्येक यशस्वी माणूस हा सकारात्मक विचारांचा असतो. आपल्या चुकांमधून खचून न जाता, आपल्याकडून काय चूक झाली ? का झाली ? माझे प्रयत्न कुठे आणि कसे कमी पडले ? कोणती पद्धत जास्त फायद्याची ठरली असती ? असे जर आपल्या चुकांचे आपणच परीक्षण केले आणि स्वतःला सुधारले, तरच आपण यशाकडे वाटचाल करु शकतो.

सकारात्मक विचार करा-

म्हणजेच स्वतः बद्दल, स्वतःच्या सामर्थ्याचा योग्य अंदाज असणे, आत्मविश्वास असणे. स्वतः च्या कष्टांवर, कर्तृत्वावर विश्वास असणे आणि स्वतः चे बलस्थान ओळखून असणे. आपल्या स्वतः च्या सामर्थ्याचा अंदाज आपण स्वतः जितक्या चांगल्या प्रकारे करु शकतो, तेवढा कोणीच करु शकत नाही. मला काय येते ? मी काय करु शकतो ? हे पाहून त्या क्षेत्रात आघाडी मारणे अधिक प्रभावी असते. आपल्याला काय येत नाही, याचा विचार करण्यापेक्षा, आपल्याला प्रयत्नपूर्व काय येऊ शकते, ते पाहून त्यातल्या महामार्गाचा विचार करता आला पाहिजे.

म्हणजेच स्वतः बद्दल, स्वतःच्या सामर्थ्याचा योग्य अंदाज असणे, आत्मविश्वास असणे. स्वतः च्या कष्टांवर, कर्तृत्वावर विश्वास असणे आणि स्वतः चे बलस्थान ओळखून असणे. आपल्या स्वतः च्या सामर्थ्याचा अंदाज आपण स्वतः जितक्या चांगल्या प्रकारे करु शकतो, तेवढा कोणीच करु शकत नाही. मला काय येते ? मी काय करु शकतो ? हे पाहून त्या क्षेत्रात आघाडी मारणे अधिक प्रभावी असते. आपल्याला काय येत नाही, याचा विचार करण्यापेक्षा, आपल्याला प्रयत्नपूर्व काय येऊ शकते, ते पाहून त्यातल्या महामार्गाचा विचार करता आला पाहिजे.

हे कुठेतरी मी वाचले होते........


दिलीप खापरे@3:55 AM < 4 (0) @ Add

. . ° º o O o º ° . .


36
Monday, September 21, 2009

फळांचे गुण

फळांचे गुण दडले आहेत त्यांच्या आकारात
हे जग परमेश्वराने निर्माण केले आहे, अशी एक आपली श्रद्धा आहे. ती खरी मानायची तर माणूस हे परमेश्वराचे लाडके अपत्य मानायला हवे. याचे कारण म्हणजे परमेश्वराने निसर्गात ज्या गोष्टी तयार केल्या आहेत त्याचा मानवाला जास्तीत जास्त कसा उपयोग होईल, याचाच विचार करुन तयार केल्या आहेत. शास्त्रज्ञांनीही तसे सांगितले आहे. अगदी फळांचाच आकार घ्या. फळांचे आकार मानवी अवयवांशी साधर्म्य राखणारे आहेत. इतकेच नव्हे तर ही फळे ज्या मानवी अवयवांसारखी दिसतात त्या अवयवांना ती उपयोगी पडतात, असे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. गाजर गोल कापले की ते मानवी डोळ्यांसारखे दिसते. म्हणजे त्याच्या मधल्या भागाकडे नीट पाहिल्यावर तो बुबुळासारखा दिसतो. गाजर खाण्याने रक्ताची कमतरता भरुन निघते; पण त्याचबरोबर गाजर दृष्टी चांगली होण्यासाठीही तितकेच उपयोगी पडते.     टोमॅटो चिरला की आत त्याचे चार भाग दिसून येतात. माणसाच्या हदयाचेही चार भाग असतात आणि टोमॅटोत असणारे लाइकोपीन नावाचे द्रव्य हदयासाठी गुणकारी आहे. द्राक्षांचे घोस असतात. हे घोस रक्तपेशींप्रमाणे दिसतात. द्राक्षे खाल्ल्याने रक्त वाढण्यास मदत होते. आक्रोडाचा आतल्या भाग मानवी मेंदूसारखा दिसतो. बटाटयाचा आकार स्वादुपिंडासारखा आहे. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये ग्लुकोजच्या प्रमाणात कार्बोहायड्रेट तयार करण्याचे काम बटाटा करतो. कांदा चिरला की त्याचा आकार पेशींसारखा दिसतो. अलीकडेच एका संशोधनात आढळून आले आहे की, पेशींमध्ये नको असलेल्या पदार्थांना बाहेर काढण्यात कांदा मदत करतो. लसूणदेखील शरीरातील नको असलेल्या पदार्थांना बाहेर काढण्यात मदत करतो. आहे की नाही निसर्गाची करणी माणसाच्या भल्याची ?

दैनिक ’पुढारी’ मधील एका लेखावरून, वाचकांच्या माहितीसाठी.


दिलीप खापरे@4:40 AM < 4 (0) @ Add

. . ° º o O o º ° . .


36
Thursday, September 03, 2009

गणपती बाप्पा मोरया!!! - दीपा कुलकर्णी

सुंदर कविता, व्यनी मदी गावली.

 

image001


Rohini Khapre - Ghawalkar@5:41 AM < 4 (0) @ Add

. . ° º o O o º ° . .