{khapre.org}
Nothing More : Nothing Less : Just Perfect : Online Since 1997
56
Thursday, October 09, 2008

मुर्ख सरकार, विवाहबाह्य संबंध आणि पुरुषांवर अन्याय

कायदेशीररीत्या विवाह न करता पत्नी म्हणून पुरुषासमवेत एकत्र राहणाऱ्या कोणत्याही महिलेला यापुढे पत्नीचा दर्जा देण्याच्या भारतीय दंड संहितेतील प्रस्तावित तरतुदीस बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने हा कायदा करुन संपुर्ण भारतीय विवाह संस्थेला मोडकळीत आणले आहे.

  1. भारतीय समाज आणि संस्कॄती वैवाहिक नात्यांवर अवलंबुन आहे. यामुळे विवाहबाह्य संबंध समाजाला मान्य करावे लागतील. यावरुन आपले कायदे चांगल्या-वाईटाचा विचार न करता फक्त निवडणुकीतील मतांसाठी केले जातात हे लक्षात येत आहे. असे कायदे देशाच्या मुळावर आघात करत आहेत.
  2. सरकारने "पत्नी" या शब्दाची व्याख्या बदलली आणि सगळ्या विवाहबाह्य संबंधांना कायदेशीर करुन टाकले आहे. कोणतिही स्त्री आता विवाह बंधनात न अडकता पत्नीचे फायदे मिळवु शकते. स्त्री-पुरुषांनी विवाहबाह्य संबंध ठेवणे हा त्यांचा व्यक्तीगत प्रश्न आहे. पण त्या नात्याला विवाहाचा दर्जा देणे हे अतिशय चूक आहे.
  3. सरकारने हा कायदा करताना सर्व द्वि-भार्या कयद्याचाही विचार करु नये हे अगदी चुकिचे आहे. आता जर कोणी विवहित पुरुष अन्य स्त्री बरोबर राहत असेल तर तो द्वि-भार्या कायद्यात अडकेल का?
  4. पण या कायद्याने सर्वात जास्त अडकला तो पुरुष, असे संबंध जर स्त्री-पुरुषाच्या परस्पर संमतीने घडत असतील तर फक्त स्त्री पोटगीला लायक कशी. आपल्या मुर्ख सरकारला "पती" या शब्दाची व्याख्या का बदलाविशी वाटत नाही? जर स्त्री आणि पुरुष कायद्यासमोर समान असतील तर त्यांना यात भेदभाव का? पुरुषाला पण पोटगीचा अधिकार का नसावा? सरकारच्या अशा व्यवहारामुळे, आपण अजुनही मानतो की स्त्री पुरूषापेक्षा जास्त कमत नाही.
  5. असे विवाहबाह्य संबंधाचे लोण "सुशिक्षीत-असंस्कॄत" उच्च-मध्यम वर्गीयांचे देणे आहे. विवाहबाह्य संबंधाचे खुळ भारतात पाश्चात्य प्रभावाने सुरु झाले आहे. जगातील व्यक्तीगत स्वातंत्र्याचा झेंडा मिरवणा‍‍‍‍‍र्‍या अमेरिकेतही विवाहबाह्य संबंधानी पोटगी मिळत नाही. असे संबंध जगभरात तात्पुरते मानले जातात, ज्यामुळे स्त्री-पुरुषाला एकमेकांना समजण्याची संधी मिळते, आणि त्याचे रुपांतर विवाह व्हावे अशी सर्व सामान्य अपेक्षा असते.

असे कायदे करणारे भारतात असतील तर भारतीय संस्कॄतीची वाट लागायला वेळ लागणार नाही. त्यात महत्वाचा वाटा "सेवानिवृत्त न्या. मल्लीमथ, एस. वर्धाचार्य, आयएएस अमिताभ गुप्ता, आयपीएस डॉ. माधव मेनन, पी. व्ही. सुब्बाराव आणि महाराष्ट्र सरकार" या मुर्खांचा नक्की असेल.

Labels: ,


Vishal KHAPRE | Mi Marathi Manus@11:47 AM < 4 (1) @ Add
Wednesday, December 17, 2008 2:41:00 PM
Blogger SB म्हणतात की....

काही दिवसांनी, या मूर्खांनी वेश्याव्यवसायाला Sex Service म्हणून मान्यता दिली नाही तरच आश्चर्य !


. . ° º o O o º ° . .


56
Monday, September 29, 2008

औद्योगिक जगतातील सर्वात शक्तीशाली महिला

औद्योगिक जगतातील सर्वात शक्तीशाली महिलांमध्ये भारतीय वंशाच्या इंद्रा कॄष्णमुर्थी नूयी या प्रथम क्रमांकावर आहेत. त्या पेप्सीच्या प्रमुख कार्यकारी संचालिका व अध्यक्षा आहेत.

REF: CNN MONEY

आपणा सर्व भारतीयांना या गोष्टीचा अभिमान असावा की वैयक्तिक स्वातंत्र्याचा डंका वाजवणा‍र्‍या अमेरिकेत अजुनही एकही स्त्री राष्ट्रपती होऊ शकली नाही, पण आपल्या रंजल्या-गांजल्यांनी "इंदिरा" दिल्लीत बसवली. तुमच्या माहीतीसाठी, अमेरीकन स्वतंत्रतेला आता २०० पेक्षा अधिक वर्षे झाली आहेत. सर्व समानतेचा कायद्यासाठी लढा देणार्‍या आणि काळ्या जनतेला समानतेचा प्रकाश दाखवणारे मार्टिन किंग ज्यु. यांच्या गुरुला आपण अजुनही आपल्या नोटांवर आणि देशाच्या पित्याचे स्थान दिले आहे.

नारीला दुय्यम समजण्यात आपण जगभरात कुप्रसिद्ध आहोत. हजारो वर्षे नारीला तळपायाखाली ठेवणार्‍या भारतात फुले, कर्वे आणिक कित्येक पुढारी होऊन गेले. भारत सरकारला विशेष आरक्षणे बनवावी लागली. तरीसुद्धा आपण आजही नारीला समान अधिकार नाहीत म्हणुन ओरडतोय. अशा देशातील ही इंद्रा, अजुनही नारी शक्तीवर विश्वास नसणार्‍या अमेरिकेत‍ इतकी वर गेली कशी?  मेहनत म्हणा, नशीब म्हणा, पुण्याई म्हणा पण मला त्यांचा खुप अभिमान आहे की त्या भारतीय आहेत. त्यांच्या या यशात त्याच्या भारतीयत्वाचा काहीही हात आहे का नाही, ते त्या सांगतीलच.

पण आज हे मात्र नक्की की, आरक्षणाने कोणतीही असमानता नाहीशी होत नसते.

Labels: ,


Vishal KHAPRE | Mi Marathi Manus@8:20 PM < 4 (0) @ Add

. . ° º o O o º ° . .


56
Friday, August 15, 2008

हे माझ्या भारत देशा! जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!


*********************

दुरुस्ती केलेली



*********************



ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा, प्राण तळमळला ॥धृ.॥

भूमातेच्या चरणतला तुज धूता, मी नित्य पाहीला होता


मज वदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टिची विविधता पाहू


तइं जननीहृद् विरहशंकीतहि झाले, परि तुवां वचन तिज दिधले


मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन, त्वरि तया परत आणीन


विश्र्वसलो या तव वचनी मी, जगद्नुभवयोगे बनुनी मी


तव अधिक शक्त उद्धरणी मी, येईन त्वरे, कथुन सोडीले तिजला


सागरा, प्राण तळमळला ... ॥१॥





शुक पंजरी वा हिरण शिरावा पाशी, ही फसगत झाली तैसी


भूविरह कसा सतत साहू या पुढती, दश दिशा तमोमय होती


गुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे


जरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा


ती आम्रवृक्षवत्सलता रे, नवकुसुमयुता त्या सुलता रे


तो बाल गुलाब ही आता रे, फुलबाग मला, हाय, पारखा झाला


सागरा, प्राण तळमळला ...





नभि नक्षत्रे बहुत, एक परी प्यारा मज भरत भूमिचा तारा


प्रसाद इथे भव्य, परी मज भारी आईची झोपडी प्यारी


तिजवीण नको राज्य, मज प्रियसाचा वनवास तिच्या जरि वनीचा


भुलविणे व्यर्थ हे आता रे, बहुजिवलग गमते चित्ता रे


तुज सरित्पते जी सरिता रे, तद्विरहाची शपथ घालितो तुजला


सागरा, प्राण तळमळला ...





या फेनमिषें हससि निर्दया कैसा, का वचन भंगिसी ऐसा ?


त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते, भिऊनि का आंग्लभूमीते


मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी, मज विवासनाते देती


तरि आंग्लभूमि भयभीता रे, अबला न माझी ही माता रे


कथिल हे अगस्तिस आता रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला


सागरा, प्राण तळमळला ...





गीतकार :स्वातंत्र्यवीर सावरकर



http://marathi.webdunia.com/miscellaneous/special08/iday/0808/12/1080812022_1.htm


 


Labels: ,


Vishal KHAPRE | Mi Marathi Manus@10:18 AM < 4 (2) @ Add
Sunday, August 17, 2008 4:00:00 AM
Anonymous Anonymous म्हणतात की....

This not complete poem.

Sunday, August 17, 2008 4:01:00 AM
Anonymous Anonymous म्हणतात की....

This not complete poem. And the way you write.


. . ° º o O o º ° . .


56
Thursday, August 14, 2008

१५ ऑगस्ट २०२७ सालचा

खूप वाटले या दिवसाची कल्पना करून मी काही लिहू शकेन म्हणून, पण विचार केला तर फारच भायानक चित्र डोळ्यासमोर उभे राहते.

मागील पाच वर्षात computer ने जी प्रगती केली, ती गती पाहिली असता २०२७ साली काय होईल देवच जाणे. कोणी ऑफिसातच जाणार नाहीत. आताच अमेरिकेत घरी बसून काम करण्याची सोय आहे. त्यावेळेस picnic ला गेलेले असताना सुद्धा काम करता येईल. मुले e-school मध्ये शिकतील. शाळेचा प्रश्नच राहणार नाही. घरीच computer शाळेचे काम करील. मुले एवढी बिझी होतील, त्यांना आईवडिलांशी बोलायला वेळ नसणार, की ते कुठेतरी लहानपणातच पायावर उभारतील. मानवी क्लोनचीप्रगती झाली तर आई कोण आणि बाप कोण? भारतात लोकसंख्येचा स्फोट होणार. राहण्यासाठी शेती नष्ट होणार मग काय? असे खूप विचार आले, त्यात १५ ऑगस्ट चे काय होणार, हा तर विचारच विरून गेला. जर कोणाला १५ ऑगस्ट २०२७ या दिवसाची कल्पना करता येईल तर मला जरूर कळवा.

Labels: ,


दिलीप खापरे@10:25 AM < 4 (0) @ Add

. . ° º o O o º ° . .


56
Wednesday, August 13, 2008

१५ ऑगस्ट २००८ सालचा

या वर्षी १५ ऑगस्ट शुक्रवारी आलाय, १६ तारखेला चवथा शनिवार सुट्टी, १७ तारखेला रविवार, १९ तारीख मंगळवारी पतिताची सुट्टी, अशा पर्वणीच्या काळात भारतीयांच्या मनातील विचार समजले तर -

सरकारी ऑफीस मधील क्लार्क - चला एक बरं झालं, वर्षाच्या सुरवातीलाच कॅलेंडर बघून तयारी केली ते. पाच दिवसांचा कोकणात जाण्याचा बेत आखला. आधीच लॉज बुक करून ठेवले. १४ तारखेला संध्याकाळी निघायचे, १८ परत, १९ ला आराम करून २० ला ऑफिसला हजर. १८ चा casual leaveचा टाकलाय झाला पास तर ठीक, नाहितर पगार कट्‍. कोणी येणार नाही १८ ला तेव्हा मी तरी येउन काय करूना? फक्त अडचण आहे ती बंड्याची, त्याच्या शाळेत कंपलसरी झेंडावंदन आहे, काय हे? घरी केले तर चालत नाही काय? पाहिजे तर डिजीटल फोटो दाखवता आला असता. उघीच सगळ्यांनाच त्रास नाही का! बरं झालं ऑफीसमध्ये झेंडावंदन करत नाहीत ते? चला तयारीला लागलं पाहिजे.

क्लार्कची पत्नी - कित्ती छान! चार दिवस कोकणात. मजा आहे. बरं झालं बाई यांनी दूरदर्शीपणा दाखवला आणि लॉज आधीच बुक करून ठेवले. तसे हे भारी हुशार हं! १५ ऑगस्टला म्हणे महिला महिलामंडळात झेंडावंदन करणार. आम्ही जाणार ट्रिपला, तर बाकी जणी नाराज. मी म्हणते आल्यावर झेंडावंदन केले तर चालणार नाही का? मिळालंय ना स्वातंत्र्य मग त्याचे प्रदर्शन कशासाठी? इंग्रजांशी काय काअर केला होता का, की आम्ही दरवर्षी साजरा करणार म्हणून. उलट त्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या कडू आठवणी नकोत. कसा आनंदाने लोकांना हा दिवस साजरा करू द्यावा. सरकारने आनंदाप्रित्यर्थ गाड्या फुकट ठेवाव्यात. बंड्या म्हणतोय शाळेत जायाचे, पण मग बुकींगचे काय? शाळेत काहीतरी सांगता येईल. १५ ऑगस्ट काय नेहमीच येतो, कोकनात कधी जाणार?

बंड्या - शाळेत जायची खूप इच्छा आहे पण आईबाबा नको म्हणतात. गेलं पाहिजेना? बाइंनी धमकी दिलीय सहामाहीला १० मार्क कापण्याची. कंटाळा येतो. पाऊस असेल तर चिकचिक. मैदानावर उभे करतात, आणि पाऊस असेल तर सर मात्र छत्री घेतात. आमचे काय? सरांचे भाषण ऐकायला कंटाळा येतो, पुन्हा तेच तेच सांगतात, इतिहासाचे सर याच विषयावर बोअर करतात. बाबांनी छान ट्रीप अरेंज केली आहे, मजा आहे. मी तर बाबा ट्रीपलाच जाणारच.

नेता - यावर्षी माझा पहिला झेंडावंदन. घरच्यांना सांगीतलंय चांगलं आवरून घ्या. जायचंय. तर म्हणतात डबे बांधून घ्यायचे का? आता काय कपाळ? खादीचे कपडे चांगले स्टार्च घालून कडक इस्त्री केलेत, टोपी पण कडक केलीय. खादीत कसं एकदम प्रामाणिक असल्यासारखं वाटतं. खादी म्हणजे खा दिवसभर. फोटोवाल्याला सांगीतलंय आपले सगळ्या पोजमधले फोटो घ्यायला. आमच्या ५ वर्षात फक्त पाचच टायमाला १५ ओगस्ट येतो, हे काही बरोबर नाही. धा वीस वेळा तरी पायजेल.

सफाई कर्मचारी - पंधरा अगस्त आला की बास, अजीबात फुरसत नसतीया. मंडळावाले हात धुवून मागं लागत्याय, साफसफाई करायसाठी. एकट्यानं जमत न्हाय म्हणूनशान पोरांलाबी सोबत घेतूया. ते शाळंत जाऊन तरी काय करणार हायेत? मंडळवाले निस्त्या पावडरी मारा म्हणत्यात. मुकादम काय कोटा देत न्हाय? ते आपलं दवाखान्यास्नी कायबाही घिवून पाठवून देत्यात. मागल्या टायमाला लय बोंबाबोंब झालती, म्हणून या वर्षी गिरणीवाल्याला दादा बाबा करून खाली पडलेलं पीठ आणलंया, तेच टाकणार, कोणास्नी काळतंय. सम्दीजणं मजेत मिरवत्यात आनी आमी आपली काढतूया घान. कार्यकरम संपल्यावरबी, खाल्ल्याली घान काढावी लागतीच ना. एक बाकी बरं, दुसर्‍यादिसी झाडताना प्लास्टिकचे झेंडे मिळत्यात ते इकून चार पैसं तरी मिळत्यात.

मंडळाचा कार्यकर्ता - चला लवकर बाकीच्यांना गोळा करायला पाहिजे, वर्गणी काढायची ना! दहीहंडीची पण आत्ताच मागावी, नंतर देत नाहीत. मागच्या वेळेस स्पीकरवाल्यानी कमिशन द्यायला नखरा केला होता आता तो बदलला पाहिजे. स्वातंत्र्यदिनाचा एक फायदा, वर्गणीसाठी एक जादा निमीत्त. या दिवशी खादी कपडे, वर कडक गांधी टोपी घालून इंप्रेशन पाडायला बरे वाटते. गल्लीत जाऊन सर्वांना दम देऊन आलोय. सर्वांनी झेंडावंदनाला हजर राहायचे. फोटो कसा भरलेला आला पाहिजे ना! चला आता मागच्या वर्षीचा झेंडा शोधला पाहिजे, धुवून इस्त्री केला पाहिजे. झेंडा खूप वर लावतात मग फोटोत झेंडा येत नाही, जरा खाली डोक्याजवळ लावा म्हणलं तर चालत नाही म्हणतात. झेंडा असला म्हणजे कसं इंप्रेशन पडतं.

लॉज मालक - वा छान! या वेळेस सगळ्या खोल्या ओव्हरफुल्ल झाल्यात. सगळ्या नोकरांची सुट्टी कॅन्सल. बरं झालं गांधीबाबांनी, १५ तारीख पावसाळ्यात करून घेतली ते. लोकं अगदी गर्दी करतात, पाऊस अनुभवायला.झेंडावंदन करायचं काम पोलीस, मिलीटरीवाल्यांचं बाकीच्यांचं काय! भारतात सुट्ट्या खूप, आमचा धंदा खूप.

स्वातंत्र्यदेवता - या लोकांना काय सांगणार, अरे मला पारतंत्र्यातून सोडवायला, किती लोकांनी प्राण गमावले, आणि मला स्वतंत्र केलं. जर स्वातंत्र मिळालं नसतं तर हा दिवस साजरा करता आला असता काय? रस्त्यावर फिरता आले नसते. अतोनात अन्याय झाला असता. इंग्रज गब्बर झाले असते. १५ ऑगस्ट हा त्यांना आठवण करण्याचा दिवस आहे, पण सहलीच्या आनंदात कोणाला वेळ आहे. स्वातंत्र्याचा स्वैराचार झालेला आहे. असेच चालू राहिले तर मी पुन्हा एकदा पारतंत्र्यात पडणार, मग सुप्रीम कोर्टाने सांगीतल्याप्रमाणे देव सुद्धा मला वाचवू शकणार नाही. असा भारत पाहून गांधी पुन्हा अवतार घेणार नाहीत. साध्या सज्जन मुलाच्या हातात सर्व इस्टेट दिल्यावर, त्याला माज आल्यास त्या इस्टेटीची काय धुळधाण होते ते पाहणेच फक्त बापाच्या नशिबी असते, असे स्वातंत्र्यसैनिकांचे झाले आहे. देव यांना सुबुद्धी देवो.

Labels: ,


दिलीप खापरे@11:39 PM < 4 (0) @ Add

. . ° º o O o º ° . .


56

१५ ऑगस्ट १९६० सालचा

१५ ऑगस्ट १९६० सालचा. या दिवसाची तयारी शांळांमधून आठ दिवस अगोदरच सुरू व्हायची. त्या साठी कमिटी नेमली जाणार, एक शिक्षकांची आणि एक विद्यार्थ्यांची. प्रत्येकाला कामे नेमून दिली जाणार. कोणाची घाई प्रमुख पाहुणे ठरवून आणण्याची, तर कोणाची बक्षिसे आणण्याची. मुले ज्या उंच  नळीवर  झेंडा  फडकणार आहे तिला रंग लावणार, चौथर्‍याला रंग लावणार, भोवताली शेणाचा सडा घालणार. रांगोळी कुणी काढायची यात चुरस असायची. या दिवशी सकाळी लवकर येऊन फळ्यावर सुंदर झेंड्याचे चित्र काढण्याची स्पर्धा असायची.

आदल्या दिवशीच गणवेश धुवून इस्त्री केला जाणार, शक्यतो मागील वर्षी खरेदी केलेला झेंडाच छातीवर लावला जायचा. मी तर सात आठ वर्षे एकच झेंडा वापरत होतो. सकाळी लवकर उठून शाळेला जायची घाई. अगदी टापटीप. पालक जोडीने मुलांना शाळेत सोडायला येत. शाळा जवळच असायची. आतासारखी चांगली वाईट शाळा नसायची, शक्यतो मुले जवळच्या म्युनिसिपालिटी शाळेतच जात. खाजगी शाळांना अजीबात महत्व नव्हते. शाळेतील वातावरण तर अगदी पवित्र, होय पवित्रच. जिथे झेंडावंदन होणार तेथे सडा घालून रांगोळी काढलेली, सुगंधी उदबत्त्या दरवळणार, सभोवार दोन टेबले चार खुर्च्या. टेबलावर स्वच्छ टेबलक्लॉथ, चकचकीत पितळेचा तांब्या पेला, फुलदाणीत टवटवीत टपोरे बुलाब, गुलाबच कारण ते जवाहरलाल नेहरूंना आवडत, आणि चाचा नेहरूंना मुले अतिशय प्रिय. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झेंडावंदन झाल्यावर, गुणी हुषार विद्यार्थ्यांना बक्षिसाचे वाटप होई. नंतर प्रमुख पाहुण्यांचे भाषण असे, ते तर विद्यार्थी शिक्षक कान देऊन ऐकत, एवढेच काय पालकही भाषण ऐकण्यासाठी गर्दी करत, शिवाय येणारे जाणारेही थांबत.सर्व शिक्षकांचा पांढरा शुभ्र पोशाख, डोक्यावर कडक घडीची गांधी टोपी. विद्यार्थ्यांचा ड्रेस खाकी अर्धी चड्डी, पांढरा हाफ शर्ट, डोक्यावर गांधी टोपी. जर टोपी घातली नाहीतर गुरूजी, त्यावेळी सर नव्हते, बोटातील खास खड्याची लोखंडाची अंगठी मारत, ती अशी लागे की, काय बिशाद आहे, तो मुलगा बिना टोपीने शाळेत येईल, पालक तर अजिबात विचारत नसत, अगदी वेताच्या छडीने मारले तरी. गुरूजी तेवढे प्रेमही करत, आता सारखा व्यवहार नव्हता. मुलींचा ड्रेस हिरवा स्कर्ट, पांढरा झंपर, दोन वेण्या त्यांना लाल रिबन, मुख्य म्हणजे केसांना तेल लावलेले पाहिजेच, अगदी मुलांनी सुद्धा. भाषण झाल्यावर राष्ट्रगीत शाळेचे बॅंडपथक वाजवीत असे, राष्ट्रगीत चालू असताना सर्वांनी जागेवरच सावधान उभे राहायचे, अगदी मान देऊन. मग विद्यार्थ्यांना चॉकलेट आणि पाटीवरच्या रंगीत पेन्सिलचे वाटप होई, मुले अगदी कौतुकाने त्या वस्तू घरी नेत.

घरी श्रीमंत लोक झेंडा उभारत. सर्वांच्या घरी अगदी दिवाळीप्रमाणे पुरणपोळीचा बेत असे.  दुपारी बेत झाल्यावर संध्याकाळी एकमेकांच्या घरी शुभेच्छा द्यायला जात. सांगायचे राहिलेच १४ ऑगस्टला पूर्वसंध्येचे राष्ट्रपतींचे भाषण रेडियोजवळ बसून घोळक्याने कान देऊन ऐकत, नंतर त्यावर चर्चा होत.  मुलेही ऐकत कारण त्यांना त्यावर निबंध लिहावा लागे.

चौकाचौकात झेंडा वंदन होई, स्पीकर अजिबात नाही. गल्लीतले सर्वजण आवर्जून उपस्थित रहात. सबंध गावातले वातावरण अगदी मंगलमय.

परिटाला खूप काम, गांधीटोपी कशी कडक पाहिजे, मग परिट पुन्हा पुन्हा प्रेमाने इस्त्री फिरवे, मग गिर्‍हाईकाने मान डोलावल्यावर त्याची छाती अभिमानाने भरून येई.

उद्या - १५ ऑगस्ट २००८ सालचा स्वगत.

नंतर - १५ ऑगस्ट २०२७ सालचा कल्पनेतील.

Labels: ,


दिलीप खापरे@12:05 AM < 4 (0) @ Add

. . ° º o O o º ° . .


56
Wednesday, August 15, 2007

हे माझ्या भारत देशा! जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

*********************
दुरुस्ती केलेली

*********************

ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा, प्राण तळमळला ॥धृ.॥
भूमातेच्या चरणतला तुज धूता, मी नित्य पाहीला होता
मज वदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टिची विविधता पाहू
तइं जननीहृद् विरहशंकीतहि झाले, परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन, त्वरि तया परत आणीन
विश्र्वसलो या तव वचनी मी, जगद्नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्त उद्धरणी मी, येईन त्वरे, कथुन सोडीले तिजला
सागरा, प्राण तळमळला ... ॥१॥

शुक पंजरी वा हिरण शिरावा पाशी, ही फसगत झाली तैसी
भूविरह कसा सतत साहू या पुढती, दश दिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता रे, नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बाल गुलाब ही आता रे, फुलबाग मला, हाय, पारखा झाला
सागरा, प्राण तळमळला ...

नभि नक्षत्रे बहुत, एक परी प्यारा मज भरत भूमिचा तारा
प्रसाद इथे भव्य, परी मज भारी आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रियसाचा वनवास तिच्या जरि वनीचा
भुलविणे व्यर्थ हे आता रे, बहुजिवलग गमते चित्ता रे
तुज सरित्पते जी सरिता रे, तद्विरहाची शपथ घालितो तुजला
सागरा, प्राण तळमळला ...

या फेनमिषें हससि निर्दया कैसा, का वचन भंगिसी ऐसा ?
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते, भिऊनि का आंग्लभूमीते
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी, मज विवासनाते देती
तरि आंग्लभूमि भयभीता रे, अबला न माझी ही माता रे
कथिल हे अगस्तिस आता रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला
सागरा, प्राण तळमळला ...


गीतकार :स्वातंत्र्यवीर सावरकर

http://marathi.webdunia.com/miscellaneous/special08/iday/0808/12/1080812022_1.htm

Labels: ,


Vishal KHAPRE | Mi Marathi Manus@10:22 AM < 4 (0) @ Add

. . ° º o O o º ° . .